स्वातंत्र्यकाळापासून भारताला सुरक्षा क्षेत्रात अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं. ४ युद्ध झेलावी लागली. आज स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ७० वर्षांनी भारत अनेक क्षेत्रात समर्थपणे उभा आहे. सुरक्षाक्षेत्रातही भारत मागे नाही. कोणत्याही सार्वभौम राष्ट्राला ज्याप्रमाणे बाह्य संकटांपासून रक्षण करायचे असते त्याचप्रमाणे देशातील अंतर्गत सुव्यवस्था आणि शांतता यांची ही काळजी घ्यावी लागते;म्हणजेच अंतर्गत सुरक्षा सांभाळावी लागते. भारताने ४ युद्ध सक्षमपणे पेलली,सैन्याच्या मदतीने सीमा सुरक्षित केल्या,सैन्य अद्ययावत ठेवलं. भारतने ह्या बाह्य आक्रमणांपासून स्वतःचा भक्कम केलाच पण त्याच बरोबर आपल्या देशाला अंतर्गत समस्यांनाही तोंड द्यावं लागलं. दहशतवाद,नक्षलवाद,फुटीरतावादी हिंसक चळवळी अश्या अनेक समस्या भारतासमोर आल्या.अजूनही अनेक अंतर्गत समस्यांना भारत तोंड देत आहे. आताच्या काळामध्ये समस्यांची जटीलता वाढली आहे कारण कोणतीच समस्या ही केवळ अंतर्गत किंवा बाह्य राहिली नाहीये. अंतर्गत आणि बाह्य धोके हे एकमेकांशी जोडले गेले आहेत आणि त्यामुळेच अंतर्गत समस्यांची व्याप्
भारतात गरिबी आहे हे वास्तव आहे.स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारतासमोर गरिबी हा प्रश्न आहेच.तेव्हा पासून आजतागायत गरिबी निर्मुलनासाठी अनेक योजना आल्या,आकड्यांमध्ये मध्ये फरक दिसतोय पण अजूनही गरिबीचं प्रमाण खूप आहे.ज्या प्रमाणे डायबेटीस कधी एकता येत नाही इतर अनेक व्याधी घेऊन येतो त्याच प्रमाणे गरिबी बरोबर पण इतर अनेक समस्या जोडून येतात.फक्त गरिबीमुळे ज्या समस्या निर्माण होतात त्याच गरिबीची कारणे ठरतात.ह्यालाच गरीबीचे अनिष्ट चक्र(Vicious Circle Of Poverty) म्हणतात. गरिबी म्हणजे काय किंवा गरीब म्हणजे कोण हे ठरवणं कठीण काम आहे कारण मुळात गरिबी हि तुलनात्मक आहे.तरी सर्वसाधारणपणे गरिब गट ठरवण्यासाठी गरिबीच्या काही व्याख्या,काही निकष ठरवले गेले.काळानुसार हे निकष बदलत गेले.एखादी रेषा ठरवून त्या रेषेखाली येणारी लोकसंख्या गरीब धरण्यात येते.ह्या रेषेला-सीमेला दारिद्र्य रेषा म्हणतात.ही दारिद्र्य रेषा वेगवेगळ्या निकषांवर असते.उदा.-कॅलरी सेवन,प्राप्ती,खर्च इत्यादी.सध्या भारतामध्ये खर्च निकषावर आधारित गरिबी रेषा आहे.शहरी भागात ४७ रु. प्रतिदिन तर ग