Skip to main content

3D सफर!!😁😁😊 (भाग-2)


       हॉटेलमालकाला अंबाजोगाई रस्ता विचारला तर म्हटला २०० km आहे आणि 
अंबाजोगाई ला कशाला चाललाय??आम्ही सांगितलं देवी आहे ना तिथे,दर्शनाला.’अंबाजोगाई 
ला कुठ्ये देवी??येरमाळ्यात आहे.तिथे जा.”तिथेच त्यांना नमस्कार केला आणि गुगल गुरूंना 
शिरसावंद्य मानून त्यांनी सांगितलेल्या ९९ km रस्ता कापायला लागलो.सकाळी सकाळी 
सरळ सरळसोट रस्त्यावर मी गाडी चालवत होतो.आणि दोन माणसं फारच टेन्शन 
मध्ये!!बाबांचं “सेकंड टाक”आणि आईच “श्रवण सावकाश” याला कंटाळून आणि जठराग्नीला 
स्मरून नाश्त्याला गाडी थांबवली.भजे आणि पुरी भाजी हे दोनच मेनू.दोन्ही मागवले.गोळा 
भजी आणि वाटणा उसळ आणि पुरी combination भन्नाट लागत होत.खाऊन झालं आणि 
बाहेर रस्त्यावर थांबली.या संपूर्ण ट्रीप मध्ये सगळ्यात constant काय असेल तर तो आईचा 
खोकला.रस्त्यावर गाडी जवळ जाऊन थांबलेल्या आई ला खोकल्याची जोरदार उबळ आली 
आणि ती बघून आणि ऐकून एका ट्रकवाल्याने आईला इतका खोकला झालाय तर खाऊ नका 
इथे २-३ दिवस तेच तेल असता वगैरे सल्ला दिला.खाऊन तर झालं होत.सोडा आता!!असा 
म्हणून अंबाजोगाई ला पोचलो.
 


      अंबाजोगाई ला देवीचं दर्शन घेतलं.जवळपास काय बघण्यासारख आहे बघितलं.जवळच 
मराठी भाषेतले आद्य कवी मुकुंदराज महाराजांची समाधी आहे.अतिशय निसर्गरम्य 
ठिकाण.दोन्ही बाजूंना डोंगर.मध्ये दरी.दरीतून नदी वाहत्ये.डोंगर उतारावर समाधी.बाकी 
डोंगरावर तसं जंगल होतं.पक्षी अभयारण्याचे बोर्ड दिसत होते.समाधी वगैरे बघून आम्ही 
अंबाजोगाई हून निघालो.केज,मांजरसुंभा,बीड अश्या अतिशय सरळ,अजिबात वळण 
नसलेल्या कंटाळवाण्या रस्त्यावरून शहागड पर्यंत पोचलो.सरळ म्हणजे किती सरळ असावा 
रस्ता!!आता वळण येईल,आता वळण येईल पण नाहीच!!सरळ रस्ता,मग परत सरळ रस्ता 
आणि म परत सरळच रस्ता!!आमच्या गाडीला कायम तोंडली,भोंबडी(हि गावं आहेत.)आणि 
आंजर्ले रस्ता कापायची सवय.या रस्त्यांवरती सरळ रस्ता सापडणं जेवढं कठीण त्याहून या 
अंबाजोगाई-पैठण रस्त्यावर वळण येणा कठीण.शहगाडला चहा प्यायलो आणि डावीकडे 
वळून पैठण च्या दिशेने निघालो


.रस्त्यातली शेती बदलायला लागली होती.बार्शी-
अंबाजोगाई-शहागड रस्त्यावर कापूस,तूर जास्त दिसत होते.आता हा शहागड-पैठण रस्ता 
गोदावरीच्या किनाऱ्याने असल्याने आता परत ऊस दिसायला लागला होता.कापूस 
होताच.रस्ता मात्र प्रचंड खराब.वाटेत जाताना संत ज्ञानेश्वरांच आपेगाव लागलं.७ च्या 
सुमारास पैठण ला पोचलो तर ट्राफिक जाम झालं होत.ऊसवाहू ट्रक सगळे एका बाजूला 
थांबवत होते.पैठण जवळ पोचलो.गुगल गुरूंच्या म्हणण्यानुसार ज्ञानेश्वर गार्डन जवळ 
राहायला हॉटेल होती.म तिथे असलेल्या एका पोलीस काकांना ज्ञानेश्वर गार्डन ला कसा 
जायचं विचारलं.त्याने सांगितलं आणि आता काय काम तुमचं तिकडे विचारून बॉम्ब टाकला 
आमच्यावर.राहायला हॉटेल मिळेल म्हणाले आणि पुढच्या कामाला ते लागले.आम्ही मात्र 
त्यांनी असं का विचारलं याच कोड्यात.गार्डन जवळ गेलो तिथे हॉटेल्स होती पण त्यांची 
lodge गावात st stand जवळ.तिथे गेलो समान वगैरे ठेवलं आणि गार्डन ला गेलो.गार्डन ला 
गेल्या वर ते पोलीस काका असा का म्हणाले लगेच कळला.तिकीट countar वरच्या 
माणसाच्या म्हणण्या नुसार गार्डन मधला musical fountain show २ महिने झाले 
technical problem मुळे बंद होता.गार्डन बघायला उद्या सकाळी या असं आम्हाला 
सांगण्यात आलं.त्यानंतर मग आम्ही एकनाथ महाराजांच्या समाधिस्थळाकडे 
गेलो.मा.पंतप्रधान ओरडून ओरडून सांगत असलेल्या स्वच्छ भारत मिशन च स्वच्छतेचं काय 
एकही कदम या सातवाहानांच्या प्रतिष्ठान पर्यंत पोचलेलं दिसत न्हवतं.सगळीकडे कचरा,बकालपणा!!सगळी कडून डुक्कर पळतायत.जेवढी घाण तेवढी डुक्कर सुदृढ या direct 
relationship मध्ये एकही कुपोषित डुक्कर दिसत न्हवत.माजलेली नुसती!!एवढं 
प्राचीन,भरभ

राट असलेलं हे शहर,अस्वच्छतेमुळे सगळी रया गेल्या सारखं वाटत. 
         सकाळी सकाळी नाथ वाड्यात गेलो.सगळीकडे देऊळा खूप,माणसं देखील सकाळी 
सकाळी देवळात जात होती.पण त्या अस्वच्छतेच काय??एकूणच पण आपल्याकडे अशी श्री 
क्षेत्र असलेल्या ठिकाणी देऊळा चकाचक पण गाव मात्र बकालपणात स्पर्धा करताना 
दिसतात!!मग ज्ञानेश्वरांनी जिथून रेड्याच्या तोंडून वेद वदवले त्या घाटावर गेलो.



जवळच शालिवाहन राजाने अश्वमेधानंतर तिथे विजय स्तंभ बांधला आहे.साधारण १५ फूट 
असलेल्या या विजयस्तंभावर अतिशय सुंदर,अलौकिक कोरीव काम आहे.आणि नेहमी प्रमाणे 
फक्त भारतीय पुरातत्वखात्याचा एक बोर्ड!!!बाकी संपूर्ण दुर्लक्ष.कोण्या एका काळी त्याच्या 
सुशोभिकरणाचा प्रयत्न झालेल्याचे पुरावे दिसतात.बाकी मेंटेनन्स ‘००’.सातवाहनांनी 
बांधलेला खांब मात्र तसाच उभा आहे.त्यानंतर आम्ही गेलो जायकवाडी धरणावर.वरती 
फिरून आलो.आली एका ठिकाणी मिसळ खाल्ली.छोटंसं हॉटेल अगदी.हॉटेल म्हणजे 
काय,open च.बाकडी टाकलेली नुसती.मेनू मध्ये होते मिसळ आणि पोहे.मिसळ म्हणजे 
माझ्या जीवाभावाचा पदार्थ.मिसळ घेतली.आहा!!काय मिसळ!!सगळ्या ट्रीप मध्ये जर कोणत्या पदार्थाने जीभ आणि मन जिंकून घेतलं ति म्हणजे ही मिसळ.







      मिसळ खाऊन झाल्यावर आम्ही ज्ञानेश्वर उद्यानात गेलो.पूर्वावैभवाच्या खुणाच फक्त 
दिसत होत्या.Fountain show बंद होता ठीके.पण उद्यान म्हटल्यावर किमान चांगलं 
हिरवागार lawn,सुंदर फुलझाडांचे ताटवे असं तरी सुस्थितीत असायला हवं होतं ना 
किमान.नुसता रखरखाट वाटत होता.काही तुरळक फुलझाडांना तिथली माणसं 
झारीने,बादली ने पाणी घालत होती.Amusement Park म्हणून जो काही प्रकार होता तो 
कोणत्यातरी इसवी सनात इथे होता असं सांगण्यापुरताच वाटत 
होता.निवृत्ती,ज्ञानदेव,सोपान,मुक्ताबाई भिंती वर बसलेला पुतळा,त्याला खाली चाकं आणि 
रूळ.यावरून हा भिंत चालवण्याचा प्रयोग आधी होत असणार असा आमचा अंदाज.या संतांचे 
कपडे ऊनपावसाने विटलेले,फाटलेले.हैदराबाद मधला NTR गार्डन असो वा म्हैसूरच वृंदावन 
गार्डन इथे कधी अशी परिस्थिती बघितल्ये??बांधलेलं आहे त्याचा mentenance पण 
आपल्याला धड जमू नये??राज्य सरकारच्या अखत्यारीत येणारं हे उद्यान ह्याची ही 
परिस्थिती व्हावी!!हे उद्यान हे पैठण मधील मोठं आकर्षण होत.प्रत्यक्षात मात्र भ्रमनिरास 
झाला.
         पैठण म्हटल्यावर पहिल्यांदा डोक्यात येणारा नाव म्हणजे पैठणी.पैठण मध्ये मऱ्हाटी 
पैठणी कला केंद्र आहे तिथे गेलो.तिथे order नुसार पैठण्या हातमागावर तयार केल्या 
जातात.आम्ही गेलो तेव्हा विणकर वेगवेगळ्या प्रकारच्या पैठण्या विणत होते.पैठन्यांची सुरात 
२५००० पासनं.त्यात बारीक design आलं,जर आली कि किमती वाढल्या.फारच 
कलाकुसरीच काम.त्या केंद्रातच प्रशिक्षण केंद्र.त्यात शिकलेल्यांना इथे काम.साडीच्या 
किमतीच्या प्रमाणात यांचा मोबदला.२ महिने लागतात साधारण एक पैठणी विणायला.
  हे केंद्र बघून झाल्यावर आईने त्यावर लिहिलेला छोटासा लेख.
        “सिद्धटेक,अंबाजोगाई करून पैठण ला आलो.बरच ऐकला होतं पैठण विषयी आणि 
अर्थातच पैठणी विषयीही.खानदानी पैठणी काय असते ते पैठणलाच कळतहातमाग,अस्सल 
रेशीम आणि थक्क होऊ अशी कलाकुसर.निर्मितीतला आनंद आपल्याला असतोच पण पैठणी 
निर्मितीची प्रोसेस पाहून वाटला ते आनंदाहून निराला होतं.अचंबा,आश्चर्य आणि त्याहून 
अतिशय सर्वसामान्य हातून घडत असलेलं हे १००% देशी काम पाहून भारावून गेली मी.
        महाराष्ट्र शासनाचे मऱ्हाटी पैठणी कला केंद्र.४०/५० हातमाग असतील.प्रत्येक 
हातमागावर जॉबकार्ड अडकवलेलं.वस्त्र विणायला घातल्याची तारीख,रंग,दर्जा,विणकर 
स्त्री/पुरुषाचं नाव.contract basis काम चालू.वस्त्रावरील कामावर विणकराचा मोबदला 
अवलंबून.
        आम्ही ११ च्या दरम्यान गेलो होतो.एक एक करून ७/८ बायका आल्या.कुणाच्या 
हातात तान्हा बाळ तर कुणाच्या बोटाला धरून खेळकर लेकरू.हातमागाला चादर बांधून 
केलेल्या पाळण्यात तान्हुल्याला ठेवून तिचे सराईत हात सरसर चालू सुद्धा झाले.छोटुला 
आल्यावर लगेच खेळाबागाडायला सुरवात.या मुलाबाळासहित विणकर स्त्रीयांना येण्याची 
परवानगी बघून मला काय वाटलं ते शब्दात नाही मांडू शकत मी.  
        पैठणीवरचा हसरा मोर आई आम्हाला पाहून आईच्या पदराला पकडून ठेवणारा हा 
लाजरा मोर सारखेच वैभवशाली वाटत होते.मुलाबाळांचा विचार केला जातो ते स्थान 
देवस्थान माझ्यासाठी.आपल्याला अशी पैठणी घ्यायला कधी जमेल का??एवढा तोकडा 
विचार शिवलाच नाही मला तिथे.कसंबाई हे करतात एवढं नाजूक साजूक......कायभारी हे 
रेशीम....त्याचे रंग......आणि कसा ना चकचकीत डोळ्यांचा हा मुलगा.....कसा ना तिने 
पटक्कन पाळणा केला लेकरास!!”
     
       या नंतर म आम्ही शेवगाव मार्गे नगर आणि नगर रोड ने पुणे गाठलं.२० तारखेला माझं 
parcel पुण्यात टाकून आईबाबा परत घरी.त्याच त्याच routin मधनं जरा change 
झाला.आता परत आई बाबा hipres-२५,त्रिफळा चूर्ण असल्या routin मध्ये.माझं कॉलेज 
क्लास परत सुरु.परत असे कधी जाऊ  काय माहित आता.route मात्र ठरवून मोकळे.चलो 
कोस्टल कर्नाटका!!!
                                          
     





                                  ~श्रवण दांडेकर!!😊😊

Comments

Popular posts from this blog

गुण गाईन आवडी!!🙏

दिसामाजी काहीतरी लिहावे हा समर्थ रामदासांचा उपदेश.हाच उपदेश आचरणात आणायचा ठरवलं,हा ब्लाॅग सुरू करायच मनात आलं. आज 8 Nov. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व अर्थात पु.ल.देशपांडे उर्फ भाई यांचा जन्मदिन. मराठी मुलांचा पुलंशी पहिला परिचय होतो तो नाच रे मोरा मधून!! मी पुलंच वाचलेलं पहिलं पुस्तक हे 'व्यक्ती आणि वल्ली'.हे पुस्तक वाचल्यापासून मी अक्षरशः पुलंच्या प्रेमात पडलो.त्यानंतर त्यांच मिळेल ते पुस्तक वाचत गेलो.(पुस्तकं वाचण्याच्या बाबतीत माझाही जरा सखाराम गटणे होतो!!😅) पुलंची निरीक्षण शक्ती काही वेगळीच होती.आणि लिहण्याची आणि सादर करण्याची शैली तर खासचं!! बटाट्याची चाळीतील गोंधळ असो वा चितळे मास्तरांचा तास सर्व काही त्यांनी डोळ्यासमोर उभं केलं!!अपूर्वाई,पूर्वरंग,जावे त्याच्या देशा यांमधून Without passport,visa जगप्रवास घडवला!! हजरजबाबी म्हटल्यावर 2 व्यक्ती समोर येतात त्या म्हणजे आचार्य अत्रे आणि पुल!कोट्या आणि पुलं म्हणजे जवळजवळ समानार्थीच!कितीही उदाहरणं दिली तरी कमीच. पुलंनी अनेक चित्रपटांच्या कथा लिहल्या,संगीत दिलं,नाटकं लिहली.माझं सर्वात आवडतं नाटक म्हणजे जाॅर्ज बर्नाॅ

The High Functioning Sociopath!!

                              गुप्तहेर या माणसाबद्दल सर्वांनाच एक आकर्षण असतं.फिक्शन साठी तर गुप्तहेर हा एक मोठा विषय आहे.फिक्शनच्या जगामध्ये 007 जेम्स बॉण्ड पासून ते अगदी झी मराठी वरची अस्मिता या रेंज मध्ये अनेक गुप्तहेर आहेत पण या सगळ्यांचा आद्य जनक आणि ज्याचा ठसा प्रत्येक गुप्तहेर कथेत कुठेना कुठे तरी दिसतोच तो म्हणजे शेरलॉक होल्म्स!!अतिशय तीव्र निरीक्षण शक्ती,Science Of Deduction ही स्वतःची तर्क करण्याची पद्धत यामुळे शेरलॉक हा सगळ्यात वरचढ ठरतो!!                          ३१ ऑक्टोबर १८५७ या दिवशी ' अ स्टडी इन स्कार्लेट 'ही शेरलॉक होम्स ची पहिली कथा सर आर्थर कॉनन डॉयलांच्या लेखणीतून उतरून वाचकांच्या समोर आली.त्यानंतर तब्बल २ वर्षांनी 'साइन ऑफ फोर' प्रसिद्ध झाली.(हाच आदर्श सध्या BBC चालवत्ये!!) नंतर स्ट्रॅन्ड या लंडन मधल्या प्रसिद्ध मासिकाने दरमहा कथेची मागणी केली आणि स्ट्रॅन्ड मधून दर महिन्याला एक शेरलॉक होम्स कथा प्रसिद्ध व्हायला लागली.१९ व्या शतकातलं घोडागाड्यांमधून फिरणारं,दाट धुक्यातलं लंडन सर आर्थर कॉनन डॉयल यांनी डोळ्यासमोर उभं के

समस्या भारतासमोरच्या-गरिबी!!

           भारतात गरिबी आहे हे वास्तव आहे.स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारतासमोर गरिबी हा प्रश्न आहेच.तेव्हा पासून आजतागायत गरिबी निर्मुलनासाठी अनेक योजना आल्या,आकड्यांमध्ये मध्ये फरक दिसतोय पण अजूनही गरिबीचं प्रमाण खूप आहे.ज्या प्रमाणे डायबेटीस कधी एकता येत नाही इतर अनेक व्याधी घेऊन येतो त्याच प्रमाणे गरिबी बरोबर पण इतर अनेक समस्या जोडून येतात.फक्त गरिबीमुळे ज्या समस्या निर्माण होतात त्याच गरिबीची कारणे ठरतात.ह्यालाच गरीबीचे अनिष्ट चक्र(Vicious Circle Of Poverty) म्हणतात.                                    गरिबी म्हणजे काय किंवा गरीब म्हणजे कोण हे ठरवणं कठीण काम आहे कारण मुळात गरिबी हि तुलनात्मक आहे.तरी सर्वसाधारणपणे गरिब गट ठरवण्यासाठी गरिबीच्या काही व्याख्या,काही निकष  ठरवले गेले.काळानुसार हे निकष बदलत गेले.एखादी रेषा ठरवून त्या रेषेखाली येणारी लोकसंख्या गरीब धरण्यात येते.ह्या रेषेला-सीमेला दारिद्र्य रेषा म्हणतात.ही दारिद्र्य रेषा वेगवेगळ्या निकषांवर असते.उदा.-कॅलरी सेवन,प्राप्ती,खर्च इत्यादी.सध्या भारतामध्ये खर्च निकषावर आधारित गरिबी रेषा आहे.शहरी भागात ४७ रु. प्रतिदिन तर ग