Skip to main content

The High Functioning Sociopath!!

                  


           गुप्तहेर या माणसाबद्दल सर्वांनाच एक आकर्षण असतं.फिक्शन साठी तर गुप्तहेर हा एक मोठा विषय आहे.फिक्शनच्या जगामध्ये 007 जेम्स बॉण्ड पासून ते अगदी झी मराठी वरची अस्मिता या रेंज मध्ये अनेक गुप्तहेर आहेत पण या सगळ्यांचा आद्य जनक आणि ज्याचा ठसा प्रत्येक गुप्तहेर कथेत कुठेना कुठे तरी दिसतोच तो म्हणजे शेरलॉक होल्म्स!!अतिशय तीव्र निरीक्षण शक्ती,Science Of Deduction ही स्वतःची तर्क करण्याची पद्धत यामुळे शेरलॉक हा सगळ्यात वरचढ ठरतो!! 



           
            ३१ ऑक्टोबर १८५७ या दिवशी 'अ स्टडी इन स्कार्लेट'ही शेरलॉक होम्स ची पहिली कथा सर आर्थर कॉनन डॉयलांच्या लेखणीतून उतरून वाचकांच्या समोर आली.त्यानंतर तब्बल २ वर्षांनी 'साइन ऑफ फोर' प्रसिद्ध झाली.(हाच आदर्श सध्या BBC चालवत्ये!!) नंतर स्ट्रॅन्ड या लंडन मधल्या प्रसिद्ध मासिकाने दरमहा कथेची मागणी केली आणि स्ट्रॅन्ड मधून दर महिन्याला एक शेरलॉक होम्स कथा प्रसिद्ध व्हायला लागली.१९ व्या शतकातलं घोडागाड्यांमधून फिरणारं,दाट धुक्यातलं लंडन सर आर्थर कॉनन डॉयल यांनी डोळ्यासमोर उभं केलं.स्ट्रॅन्ड चा खप शेरलॉक मुळे प्रचंड वाढायला लागला.शेरलॉक ला प्रचंड यश मिळत असताना सर डॉयल मात्र लोकांना शेरलॉक सोडून आपल्याकडून काही नकोय म्हणून वैतागून गेले होते.आपण म्हणजे शेरलॉक या समीकरणातून बाहेर  पडण्याचा विचार करत असताना त्यांना स्वित्झर्लंडला उपाय सापडला.स्ट्रॅन्ड मधून प्रसिद्ध झाली 'द फायनल प्रॉब्लेम.' यात जिम मॉरीयार्टी या  क्रिमिनल मास्टरमाईंड शी लढताना शेरलॉक दरीत कोसळून मृत्युमुखी पडतो.या घटनेनंतर स्ट्रॅन्ड चे एका दिवसात २२००० वर्गणीदार कमी झाले.सर्वत्र सर डॉयल यांनी परत शेरलॉक लिहावं या साठी प्रयत्न चालू होते.अगदी इंग्लंडच्या राणीने देखील प्रयत्न केले पण सर डॉयल सगळीकडे दुर्लक्ष करून स्वित्झर्लंड मध्ये बसले होते.अखेर ७ वर्षानंतर सर चाहत्यांच्या दबावाखाली झुकले आणि पुढची कथा आली-'एमटी हाऊस'  शेरलॉक होम्स जिवंत!!तो मेलाच न्हवता.या नंतर शेरलॉक च्या कथा येतच राहिल्या. 'हिज लास्ट बो' हि सर आर्थर कॉनन डॉयल यांची शेवटची शेरलॉक कथा.१८५७ मध्ये २५ पौंड्स मानधन मिळालेल्या सर डॉयल ना १९०३ मध्ये १३ कथांच्या संग्रहाला तब्बल ४५००० पौंड्स मानधन मिळालं!!सर डॉयल यांनी शेरलॉक लिहणं थांबवलं मात्र त्यांच्या या मानसपुत्राचा दबदबा एवढा वाढला होता की त्यांच्या या कथांचे अनुवाद अनेक भाषांमध्ये तर झालेच पण अनेक लेखकांनी शेरलॉक वर अनेक पुस्तके लिहली.सर डॉयल यांच्या मुलाने डॉ.वॉटसन ने उल्लेख केलेल्या पण प्रकाशित न झालेल्या होम्सकथा 'THE EXPLOITES OF SHERLOCK HOLMES' या पुस्तकातून प्रसिद्ध केल्या. 
सर आर्थर कॉनन डॉयल 
                         

          शेरलॉक ही काल्पनिक व्यक्तिरेखा नसून आर्थर कॉनन डॉयल यांचच एक रूप आहे असा अनेकांचा विश्वास होता.त्यामुळे अनेक जण त्यांच्याकडे त्यांच्या समस्या घेऊन यायचे.शेरलॉक लिहायच्या आधी सर डॉयल यांनी ३६ वर्ष Science Of Deduction चा स्वतः अभ्यास केला होता.अनेक गुन्हेगारीच्या-गुंतागुंतीच्या केसेस मध्ये त्यांचा मत महत्वाचं मानलं जायचं.कुत्र्यांचा माग काढण्यासाठी उपयोग,ठसे घेण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिस चा उपयोग,बोटांचे ठसे,सिगार ची राख,टायर चे छाप,मानवी रक्ताची तपासणी,कपड्यांचे धागे-त्यात अडकलेली धूळ या सगळ्यांचा वापर आजही पोलीस-गुप्तहेर संस्था करतात या सर्वांचं मूळ हे या शेरलॉक मध्ये आहे.चीन-इजिप्त सारख्या अनेक देशांमध्ये पोलीस प्रशिक्षणामध्ये शेरलॉक होम्स चा आणि त्याच्या Science Of Deduction चा वापर केला जातो.
Principal of Science Of Deduction 
                     

                पुस्तक-कथा एवढ्या प्रसिद्ध झाल्यानंतर शेरलॉक ला दृश्य स्वरूपात आणण्याचे प्रयत्न सुरु झाले.१९१६ मध्ये शेरलॉक वर पहिला चित्रपट आला.तेव्हा पासून ते आत्ताच्या रॉबर्ट डाउनी ज्युनिअर च्या शेरलॉक पर्यंत साधारण ३०-३५ सिनेमे आले.यातले काही कथांवर आधारित आहेत तर काहींमध्ये बदल करून मॉडिफिकेशन्स केली आहेत.सिनेमा मध्ये सर्व काही पूर्ण होत न्हवत आणि यातूनच १९५४ मध्ये शेरलॉक TV वर आला.३९ भागांच्या या सिरीज मध्ये सर आर्थर कॉनन डॉयल यांनी लिहलेल्या कथा दाखवण्यात आल्या.त्यानंतर १९६५ मध्ये BBC ने शेरलॉक सिरीज आणली.मग १९८३ मध्ये अजून एक सिरीज.या सगळ्या सिरीज मध्ये कथा होत्या तशाच,जुन्या काळात दाखवल्या. 
Add caption

                           Sherlock Holmes 1954 Series
                                   Sherlock Holmes 1983                              
                        
                                     २०१० मध्ये BBC ने SHERLOCK सिरीज सुरु केली.यातील कथा या  Based on work of Sir Arthur Conan Doyle आहेत.शेरलॉक हा सुद्धा २०१० मध्ये आलाय.सुरवातीला हे एपिसोड बघायच्या आधी वाटलेलं की याला काय अर्थ शेरलॉक म्हणजे त्याच काळात पाहिजे,त्याच गोष्टी पाहिजेत पण ही सिरीज पण तेवढीच किंबहुना आधीच्यांपेक्षा जरा जास्तच भारी झाल्ये.उत्कृष्ट दिग्दर्शन,सर्व कलाकारांचे जबरदस्त अभिनय,संवाद,कथेत केलेले काही बदल-आत घातलेल्या नवीन गोष्टी आणि background music यांमुळे शेरलॉक ची ही सिरीज कितीही वेळा बघितली तरी कंटाळा येत नाही.या सिरीज मध्ये जिम मॉरीयार्टी हा Central Villian म्हणून दाखवण्यात आलाय.आता पर्यंत ४ सिझन प्रचंड वेळ काढून BBC ने आणलेले आहेत.प्रत्येक सिझन मध्ये दीड-दीड तासांचे ३-३ एपिसोड आहेत.
                                 

शेरलॉक ची ही सिरीज आणि ओरिजिनल कथा नक्की वाचा.शेरलॉक च्या तोंडचे Quotes त्याचे संवाद हे एका वेगळ्याच लेव्हल चे आहेत.जे  पुस्तकात तर बरेच आहेत.
                   
                  शेरलॉक.एका माणसाच्या कल्पनेतील व्यक्तिरेखा एवढी प्रसिद्ध होते.जगातील अनेक भाषांमध्ये अनुवाद होतात.ही व्यक्तिरेखा जिथे तयार झाली,पहिल्यांदा प्रसिद्ध झाली तो देश शेरलॉक चा इतिहास सांभाळतो.आधी काल्पनिक असणारा  221 B Baker Street  हा पत्ता अस्तित्वात आला.तिथे आता शेरलॉक होम्स म्युझिअम आहे.शेरलॉक होम्स संबंधीच्या सर्व गोष्टी तिथे जपून ठेवल्या आहेत.     
                          शेरलॉक कडे  एक व्यक्ती म्हणून बघितलं तर हा तसा माणूसघाणा.डॉ.वॉटसन सोडून कोणी मित्र नाही.कायम कसले ना कसले प्रयोग करत राहणारा,ड्रग्स शौकीन.स्वतः सोडवलेल्या गुन्ह्यांच श्रेय दुसऱ्यांना हसत हसत देणारा,समाजातील दुर्जनांना त्यांच्याच पद्धतीने समजावणारा,प्रचंड बुद्धिमान Sociopath!!
                        शेरलॉक १८५७ पासून लोकांचं मनोरंजन करत आला आहे.अजून अनेक वर्ष करेल.माणसांचा कंटाळा घालवत राहील,मोठ झाल्यावर गुप्तहेर बनायचं असा स्वप्न लहान मुलांना दाखवत राहील,मोठ्यांना बालपणाची आठवण करून देत राहील,गुप्तहेरांना मार्गदर्शन करत राहील,गुन्हेगारांना तुम्ही किती प्रयत्न केलेत तरी काहीतरी मागे ठेवाल सांगत राहील,लेखकांना शेरलॉक सारखं जगप्रसिद्ध काहीतरी लिहावं या साठी प्रेरणा देत राहील,शेरलॉक अमर राहील!! 
                                                     तुम्ही शेरलॉक वाचलायत ना??वाचला असाल तर आवडती केस टाका कॉमेंट मध्ये!!बघितला असेल तर एपिसोड सांगा!!वाचला असेल तर आता बघा पण आणि बघितला असेल पण वाचला नसेल तर आवर्जून वाचा!!दोन्ही केला नसेल तर आधी वाचा मग बघा!!चर्चा करूच  म !!
                                                                                              
                                                                                                                                              धन्यवाद!!
                                                                                                                                ©श्रवण दांडेकर 


Comments

  1. श्रवण लहानपणी वाचलय
    Very good

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks Sanjay kaka!!
      Jamla tr vach asach ekda😅😅

      Delete
  2. Chan...kuthe milali mahiti evadhi...

    ReplyDelete
  3. Shravan khup bhari👍
    Beat episode Irene Adler cha😬

    ReplyDelete
  4. Shravan khup bhari👍
    Beat episode Irene Adler cha😬

    ReplyDelete
    Replies
    1. Ummm...Dominatrix ha!!😂😜
      I Am SHER Locked!!😄😄

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

गुण गाईन आवडी!!🙏

दिसामाजी काहीतरी लिहावे हा समर्थ रामदासांचा उपदेश.हाच उपदेश आचरणात आणायचा ठरवलं,हा ब्लाॅग सुरू करायच मनात आलं. आज 8 Nov. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व अर्थात पु.ल.देशपांडे उर्फ भाई यांचा जन्मदिन. मराठी मुलांचा पुलंशी पहिला परिचय होतो तो नाच रे मोरा मधून!! मी पुलंच वाचलेलं पहिलं पुस्तक हे 'व्यक्ती आणि वल्ली'.हे पुस्तक वाचल्यापासून मी अक्षरशः पुलंच्या प्रेमात पडलो.त्यानंतर त्यांच मिळेल ते पुस्तक वाचत गेलो.(पुस्तकं वाचण्याच्या बाबतीत माझाही जरा सखाराम गटणे होतो!!😅) पुलंची निरीक्षण शक्ती काही वेगळीच होती.आणि लिहण्याची आणि सादर करण्याची शैली तर खासचं!! बटाट्याची चाळीतील गोंधळ असो वा चितळे मास्तरांचा तास सर्व काही त्यांनी डोळ्यासमोर उभं केलं!!अपूर्वाई,पूर्वरंग,जावे त्याच्या देशा यांमधून Without passport,visa जगप्रवास घडवला!! हजरजबाबी म्हटल्यावर 2 व्यक्ती समोर येतात त्या म्हणजे आचार्य अत्रे आणि पुल!कोट्या आणि पुलं म्हणजे जवळजवळ समानार्थीच!कितीही उदाहरणं दिली तरी कमीच. पुलंनी अनेक चित्रपटांच्या कथा लिहल्या,संगीत दिलं,नाटकं लिहली.माझं सर्वात आवडतं नाटक म्हणजे जाॅर्ज बर्नाॅ

समस्या भारतासमोरच्या-गरिबी!!

           भारतात गरिबी आहे हे वास्तव आहे.स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारतासमोर गरिबी हा प्रश्न आहेच.तेव्हा पासून आजतागायत गरिबी निर्मुलनासाठी अनेक योजना आल्या,आकड्यांमध्ये मध्ये फरक दिसतोय पण अजूनही गरिबीचं प्रमाण खूप आहे.ज्या प्रमाणे डायबेटीस कधी एकता येत नाही इतर अनेक व्याधी घेऊन येतो त्याच प्रमाणे गरिबी बरोबर पण इतर अनेक समस्या जोडून येतात.फक्त गरिबीमुळे ज्या समस्या निर्माण होतात त्याच गरिबीची कारणे ठरतात.ह्यालाच गरीबीचे अनिष्ट चक्र(Vicious Circle Of Poverty) म्हणतात.                                    गरिबी म्हणजे काय किंवा गरीब म्हणजे कोण हे ठरवणं कठीण काम आहे कारण मुळात गरिबी हि तुलनात्मक आहे.तरी सर्वसाधारणपणे गरिब गट ठरवण्यासाठी गरिबीच्या काही व्याख्या,काही निकष  ठरवले गेले.काळानुसार हे निकष बदलत गेले.एखादी रेषा ठरवून त्या रेषेखाली येणारी लोकसंख्या गरीब धरण्यात येते.ह्या रेषेला-सीमेला दारिद्र्य रेषा म्हणतात.ही दारिद्र्य रेषा वेगवेगळ्या निकषांवर असते.उदा.-कॅलरी सेवन,प्राप्ती,खर्च इत्यादी.सध्या भारतामध्ये खर्च निकषावर आधारित गरिबी रेषा आहे.शहरी भागात ४७ रु. प्रतिदिन तर ग