Skip to main content

Posts

Showing posts from October, 2017

समस्या भारतासमोरच्या-गरिबी!!

           भारतात गरिबी आहे हे वास्तव आहे.स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारतासमोर गरिबी हा प्रश्न आहेच.तेव्हा पासून आजतागायत गरिबी निर्मुलनासाठी अनेक योजना आल्या,आकड्यांमध्ये मध्ये फरक दिसतोय पण अजूनही गरिबीचं प्रमाण खूप आहे.ज्या प्रमाणे डायबेटीस कधी एकता येत नाही इतर अनेक व्याधी घेऊन येतो त्याच प्रमाणे गरिबी बरोबर पण इतर अनेक समस्या जोडून येतात.फक्त गरिबीमुळे ज्या समस्या निर्माण होतात त्याच गरिबीची कारणे ठरतात.ह्यालाच गरीबीचे अनिष्ट चक्र(Vicious Circle Of Poverty) म्हणतात.                                    गरिबी म्हणजे काय किंवा गरीब म्हणजे कोण हे ठरवणं कठीण काम आहे कारण मुळात गरिबी हि तुलनात्मक आहे.तरी सर्वसाधारणपणे गरिब गट ठरवण्यासाठी गरिबीच्या काही व्याख्या,काही निकष  ठरवले गेले.काळानुसार हे निकष बदलत गेले.एखादी रेषा ठरवून त्या रेषेखाली येणारी लोकसंख्या गरीब धरण्यात येते.ह्या रेषेला-सीमेला दारिद्र्य रेषा म्हणतात.ही दारिद्र्य रेषा वेगवेगळ्या निकषांवर असते.उदा.-कॅलरी सेवन,प्राप्ती,खर्च इत्यादी.सध्या भारतामध्ये खर्च निकषावर आधारित गरिबी रेषा आहे.शहरी भागात ४७ रु. प्रतिदिन तर ग

समस्या भारतासमोरच्या!

              भारत स्वतंत्र होऊन ७० वर्ष झाली.७० वर्षांमध्ये भारताने अनेक क्षेत्रात आश्चर्यकारक प्रगती केली.१५ ऑगस्ट १९४७ च्या तुलनेत आपण बरेच पुढे आलो आहोत पण अजूनही अनेक समस्या देशासमोर आ वासून उभ्या आहेत.यातील अनेक समस्यांशी अनेक वर्ष सामना करूनही अपेक्षित बदल दिसून येत नाहीत.याची कारणे काय?समस्याच मोठ्या जटील आहेत?की त्या सोडवण्यात प्रयत्न कमी पडतायत?की आपण नेमक्या समस्या काय आहेत त्या ओळखल्याच नाहीयेत?की वैयक्तिक स्वार्थ साठी या समस्या तश्याच कुजवत ठेवायच्या आहेत?                 भारतासमोरच्या नेमक्या समस्या कोणत्या याचा विचार करताना मला अनेक समस्या सुचल्या.यातील काही एकमेकांशी जोडता येतील,अनेकवेळा एका समस्येचं मूळ दुसर्या समस्येत सापडेल.काही खूप महत्वाच्या,काही कमी महत्वाच्या छुल्लक वाटतील पण ह्या सर्व समस्या सुटतील तेव्हाच खरे अच्छे दिन येतील.           ह्या समस्या लिहताना कोणताही criteria ठेवलेला नाही.Brain Storming करत सुचत गेल्या तश्या लिहिल्या आहेत.            भारतासमोरच्या समस्या!!    1. गरिबी. 2. आरोग्य. 3. शिक्षण. 4. आर्थिक साक्षरता. 5. राजकीय साक्षरता.