Skip to main content

समस्या भारतासमोरच्या!




              भारत स्वतंत्र होऊन ७० वर्ष झाली.७० वर्षांमध्ये भारताने अनेक क्षेत्रात आश्चर्यकारक प्रगती केली.१५ ऑगस्ट १९४७ च्या तुलनेत आपण बरेच पुढे आलो आहोत पण अजूनही अनेक समस्या देशासमोर आ वासून उभ्या आहेत.यातील अनेक समस्यांशी अनेक वर्ष सामना करूनही अपेक्षित बदल दिसून येत नाहीत.याची कारणे काय?समस्याच मोठ्या जटील आहेत?की त्या सोडवण्यात प्रयत्न कमी पडतायत?की आपण नेमक्या समस्या काय आहेत त्या ओळखल्याच नाहीयेत?की वैयक्तिक स्वार्थ साठी या समस्या तश्याच कुजवत ठेवायच्या आहेत?
                भारतासमोरच्या नेमक्या समस्या कोणत्या याचा विचार करताना मला अनेक समस्या सुचल्या.यातील काही एकमेकांशी जोडता येतील,अनेकवेळा एका समस्येचं मूळ दुसर्या समस्येत सापडेल.काही खूप महत्वाच्या,काही कमी महत्वाच्या छुल्लक वाटतील पण ह्या सर्व समस्या सुटतील तेव्हाच खरे अच्छे दिन येतील.
          ह्या समस्या लिहताना कोणताही criteria ठेवलेला नाही.Brain Storming करत सुचत गेल्या तश्या लिहिल्या आहेत.
  
        भारतासमोरच्या समस्या!!   
1. गरिबी.
2. आरोग्य.
3. शिक्षण.
4. आर्थिक साक्षरता.
5. राजकीय साक्षरता.
6. शेती आणि अन्न सुरक्षा.
7. रोजगार.
8. अंधश्रद्धा.
9. जातीयवाद.
10. असहिष्णुता?
11. महिला सबलीकरण.
12. महिला सुरक्षा.
13. न्यायालयीन शिथिलता.
14. अंतर्गत सुरक्षा.
15. सीमा सुरक्षा.
16. नक्षलवाद.
17. काश्मीर.
18. प्रादेशिक अस्मिता.
19. भ्रष्टाचार.
20. बेकायदेशीर कृत्य.
21. प्रदूषण.
22. पाणी.
23. जंगलांचा ह्रास.
24. जैवविविधतेचा ह्रास.
25. अस्वच्छता.
26. ऊर्जा.
27. राजकारण.

       ह्यात माझ्याकडून काही समस्या राहिल्या असतील,तर त्या कमेंट मध्ये लिहा.वरील लिहिलेलेल्या समस्यांचा अभ्यास करून काही लेख लिहावे असं डोक्यात आहे.समस्यांचं मूळ कारण,त्यांची सद्यस्थिती,त्यांवरचे उपाय शोधावेत आणि या सर्व गोष्टींची मांडणी करावी अशी कल्पना आहे.प्रत्येक समस्येत काही inputs मला द्यावेत अशी इच्छा आहे,कारण प्रत्येक समस्येकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगवेगळा असतो आणि या वेगवेगळ्या दृष्टीकोनातूनच उत्तरे निघतील असं मला वाटत.तरी कृपया आपल्याला जी समस्या जास्तीतजास्त त्रास देत असेल त्या विषयी काही मुद्दे नक्की मांडा.
             धन्यवाद!!!
                                                                ©श्रवण दांडेकर😃
                                          

Comments

  1. Sarvat motthi samasya rahili mitra- jatiy aarakshan

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गुण गाईन आवडी!!🙏

दिसामाजी काहीतरी लिहावे हा समर्थ रामदासांचा उपदेश.हाच उपदेश आचरणात आणायचा ठरवलं,हा ब्लाॅग सुरू करायच मनात आलं. आज 8 Nov. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व अर्थात पु.ल.देशपांडे उर्फ भाई यांचा जन्मदिन. मराठी मुलांचा पुलंशी पहिला परिचय होतो तो नाच रे मोरा मधून!! मी पुलंच वाचलेलं पहिलं पुस्तक हे 'व्यक्ती आणि वल्ली'.हे पुस्तक वाचल्यापासून मी अक्षरशः पुलंच्या प्रेमात पडलो.त्यानंतर त्यांच मिळेल ते पुस्तक वाचत गेलो.(पुस्तकं वाचण्याच्या बाबतीत माझाही जरा सखाराम गटणे होतो!!😅) पुलंची निरीक्षण शक्ती काही वेगळीच होती.आणि लिहण्याची आणि सादर करण्याची शैली तर खासचं!! बटाट्याची चाळीतील गोंधळ असो वा चितळे मास्तरांचा तास सर्व काही त्यांनी डोळ्यासमोर उभं केलं!!अपूर्वाई,पूर्वरंग,जावे त्याच्या देशा यांमधून Without passport,visa जगप्रवास घडवला!! हजरजबाबी म्हटल्यावर 2 व्यक्ती समोर येतात त्या म्हणजे आचार्य अत्रे आणि पुल!कोट्या आणि पुलं म्हणजे जवळजवळ समानार्थीच!कितीही उदाहरणं दिली तरी कमीच. पुलंनी अनेक चित्रपटांच्या कथा लिहल्या,संगीत दिलं,नाटकं लिहली.माझं सर्वात आवडतं नाटक म्हणजे जाॅर्ज बर्नाॅ

The High Functioning Sociopath!!

                              गुप्तहेर या माणसाबद्दल सर्वांनाच एक आकर्षण असतं.फिक्शन साठी तर गुप्तहेर हा एक मोठा विषय आहे.फिक्शनच्या जगामध्ये 007 जेम्स बॉण्ड पासून ते अगदी झी मराठी वरची अस्मिता या रेंज मध्ये अनेक गुप्तहेर आहेत पण या सगळ्यांचा आद्य जनक आणि ज्याचा ठसा प्रत्येक गुप्तहेर कथेत कुठेना कुठे तरी दिसतोच तो म्हणजे शेरलॉक होल्म्स!!अतिशय तीव्र निरीक्षण शक्ती,Science Of Deduction ही स्वतःची तर्क करण्याची पद्धत यामुळे शेरलॉक हा सगळ्यात वरचढ ठरतो!!                          ३१ ऑक्टोबर १८५७ या दिवशी ' अ स्टडी इन स्कार्लेट 'ही शेरलॉक होम्स ची पहिली कथा सर आर्थर कॉनन डॉयलांच्या लेखणीतून उतरून वाचकांच्या समोर आली.त्यानंतर तब्बल २ वर्षांनी 'साइन ऑफ फोर' प्रसिद्ध झाली.(हाच आदर्श सध्या BBC चालवत्ये!!) नंतर स्ट्रॅन्ड या लंडन मधल्या प्रसिद्ध मासिकाने दरमहा कथेची मागणी केली आणि स्ट्रॅन्ड मधून दर महिन्याला एक शेरलॉक होम्स कथा प्रसिद्ध व्हायला लागली.१९ व्या शतकातलं घोडागाड्यांमधून फिरणारं,दाट धुक्यातलं लंडन सर आर्थर कॉनन डॉयल यांनी डोळ्यासमोर उभं के

समस्या भारतासमोरच्या-गरिबी!!

           भारतात गरिबी आहे हे वास्तव आहे.स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारतासमोर गरिबी हा प्रश्न आहेच.तेव्हा पासून आजतागायत गरिबी निर्मुलनासाठी अनेक योजना आल्या,आकड्यांमध्ये मध्ये फरक दिसतोय पण अजूनही गरिबीचं प्रमाण खूप आहे.ज्या प्रमाणे डायबेटीस कधी एकता येत नाही इतर अनेक व्याधी घेऊन येतो त्याच प्रमाणे गरिबी बरोबर पण इतर अनेक समस्या जोडून येतात.फक्त गरिबीमुळे ज्या समस्या निर्माण होतात त्याच गरिबीची कारणे ठरतात.ह्यालाच गरीबीचे अनिष्ट चक्र(Vicious Circle Of Poverty) म्हणतात.                                    गरिबी म्हणजे काय किंवा गरीब म्हणजे कोण हे ठरवणं कठीण काम आहे कारण मुळात गरिबी हि तुलनात्मक आहे.तरी सर्वसाधारणपणे गरिब गट ठरवण्यासाठी गरिबीच्या काही व्याख्या,काही निकष  ठरवले गेले.काळानुसार हे निकष बदलत गेले.एखादी रेषा ठरवून त्या रेषेखाली येणारी लोकसंख्या गरीब धरण्यात येते.ह्या रेषेला-सीमेला दारिद्र्य रेषा म्हणतात.ही दारिद्र्य रेषा वेगवेगळ्या निकषांवर असते.उदा.-कॅलरी सेवन,प्राप्ती,खर्च इत्यादी.सध्या भारतामध्ये खर्च निकषावर आधारित गरिबी रेषा आहे.शहरी भागात ४७ रु. प्रतिदिन तर ग