भारत स्वतंत्र होऊन ७० वर्ष झाली.७० वर्षांमध्ये भारताने अनेक क्षेत्रात आश्चर्यकारक प्रगती केली.१५ ऑगस्ट १९४७ च्या तुलनेत आपण बरेच पुढे आलो आहोत पण अजूनही अनेक समस्या देशासमोर आ वासून उभ्या आहेत.यातील अनेक समस्यांशी अनेक वर्ष सामना करूनही अपेक्षित बदल दिसून येत नाहीत.याची कारणे काय?समस्याच मोठ्या जटील आहेत?की त्या सोडवण्यात प्रयत्न कमी पडतायत?की आपण नेमक्या समस्या काय आहेत त्या ओळखल्याच नाहीयेत?की वैयक्तिक स्वार्थ साठी या समस्या तश्याच कुजवत ठेवायच्या आहेत?
भारतासमोरच्या नेमक्या समस्या कोणत्या याचा विचार करताना मला अनेक समस्या सुचल्या.यातील काही एकमेकांशी जोडता येतील,अनेकवेळा एका समस्येचं मूळ दुसर्या समस्येत सापडेल.काही खूप महत्वाच्या,काही कमी महत्वाच्या छुल्लक वाटतील पण ह्या सर्व समस्या सुटतील तेव्हाच खरे अच्छे दिन येतील.
ह्या समस्या लिहताना कोणताही criteria ठेवलेला नाही.Brain Storming करत सुचत गेल्या तश्या लिहिल्या आहेत.
भारतासमोरच्या समस्या!!
1. गरिबी.
2. आरोग्य.
3. शिक्षण.
4. आर्थिक साक्षरता.
5. राजकीय साक्षरता.
6. शेती आणि अन्न सुरक्षा.
7. रोजगार.
8. अंधश्रद्धा.
9. जातीयवाद.
10. असहिष्णुता?
11. महिला सबलीकरण.
12. महिला सुरक्षा.
13. न्यायालयीन शिथिलता.
14. अंतर्गत सुरक्षा.
15. सीमा सुरक्षा.
16. नक्षलवाद.
17. काश्मीर.
18. प्रादेशिक अस्मिता.
19. भ्रष्टाचार.
20. बेकायदेशीर कृत्य.
21. प्रदूषण.
22. पाणी.
23. जंगलांचा ह्रास.
24. जैवविविधतेचा ह्रास.
25. अस्वच्छता.
26. ऊर्जा.
27. राजकारण.
ह्यात माझ्याकडून काही समस्या राहिल्या असतील,तर त्या कमेंट मध्ये लिहा.वरील लिहिलेलेल्या समस्यांचा अभ्यास करून काही लेख लिहावे असं डोक्यात आहे.समस्यांचं मूळ कारण,त्यांची सद्यस्थिती,त्यांवरचे उपाय शोधावेत आणि या सर्व गोष्टींची मांडणी करावी अशी कल्पना आहे.प्रत्येक समस्येत काही inputs मला द्यावेत अशी इच्छा आहे,कारण प्रत्येक समस्येकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगवेगळा असतो आणि या वेगवेगळ्या दृष्टीकोनातूनच उत्तरे निघतील असं मला वाटत.तरी कृपया आपल्याला जी समस्या जास्तीतजास्त त्रास देत असेल त्या विषयी काही मुद्दे नक्की मांडा.
धन्यवाद!!!
©श्रवण दांडेकर😃
Sarvat motthi samasya rahili mitra- jatiy aarakshan
ReplyDelete