Skip to main content

अंतर्गत सुरक्षा आणि आपले दायित्व!!

                    

                       स्वातंत्र्यकाळापासून भारताला सुरक्षा क्षेत्रात अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं. ४ युद्ध झेलावी लागली. आज स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ७० वर्षांनी भारत अनेक क्षेत्रात समर्थपणे उभा आहे. सुरक्षाक्षेत्रातही भारत मागे नाही. कोणत्याही सार्वभौम राष्ट्राला ज्याप्रमाणे बाह्य संकटांपासून रक्षण करायचे असते त्याचप्रमाणे देशातील अंतर्गत सुव्यवस्था आणि शांतता यांची ही काळजी घ्यावी लागते;म्हणजेच अंतर्गत सुरक्षा सांभाळावी लागते. भारताने ४ युद्ध सक्षमपणे पेलली,सैन्याच्या मदतीने सीमा सुरक्षित केल्या,सैन्य अद्ययावत ठेवलं. भारतने ह्या बाह्य आक्रमणांपासून स्वतःचा भक्कम केलाच  पण त्याच बरोबर आपल्या देशाला अंतर्गत समस्यांनाही तोंड द्यावं लागलं. दहशतवाद,नक्षलवाद,फुटीरतावादी हिंसक चळवळी अश्या अनेक समस्या भारतासमोर आल्या.अजूनही अनेक अंतर्गत समस्यांना भारत तोंड देत आहे. आताच्या काळामध्ये समस्यांची जटीलता वाढली आहे कारण कोणतीच समस्या ही केवळ अंतर्गत किंवा बाह्य राहिली नाहीये. अंतर्गत आणि बाह्य धोके हे एकमेकांशी जोडले गेले आहेत आणि त्यामुळेच अंतर्गत समस्यांची व्याप्प्ती वाढली आहे. अंतर्गत सुरक्षेत रोज नवनवीन आव्हाने समोर येत आहेत.अश्या काळामध्ये देशासमोरील आव्हानांचा अभ्यास करणे,सतर्कता पाळणे आणि ह्या आव्हानांचा सामना करणाऱ्या सुरक्षा यंत्रणांना सहकार्य करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. 
       
                  नक्षलवादी चळवळ ही अंतर्गत सुरक्षेसमोरील एक मोठी समस्या आहे.'जल-जंगल-जमीन' ह्या मुद्द्यांवर १९६७ साली ही हिंसक चळवळ सुरु झाली.सद्य स्थितीमध्ये १७ राज्यातील ६०२ जिल्ह्यांपैकी १८५ जिल्हे नक्षलग्रस्त आहेत.नेपाळ सीमेपासून पूर्व कर्नाटक पर्यंतचा पट्टा हा नक्षलग्रस्त आहे.ह्या भागाला 'रेड कॉरिडॉर' असे म्हटले जाते.दहशत बसवण्यासाठी नक्षलवादी माओ-त्से-तुंग ने सांगितलेल्या गनिमीकाव्याच्या पद्धतीने भारतीय सुरक्षा दले तसेच सरकारी यंत्रणा ह्यांवर हल्ला करतात. २००४ मध्ये अनेक कम्युनिस्ट गट एकत्र आले व त्यांनी CPI(M) ही भारतीय प्रोलेटरिएट गटाचं प्रतिनिधित्व करेल व त्याची वैचारिक मांडणी ही मार्क्स-लेनिन-माओ वादी असेल असे जाहीर केले.नववसाहतवादी,शोषण करणारे सरकार उलथवून जनतेचे(??) राज्य आणायचे व त्यासाठी सशस्त्र बंड करायचे हे त्यांचे प्रमुख राजकीय उद्दिष्ट आहे.वरकरणी बघता ही कल्पना छान वाटते.कामगार,मजूर इत्यादी कष्टकरी समाजातील तरुण हे आपल्या हक्कासाठीच चालू आहे असं समजून भुलतात,त्याचप्रमाणे काही तरुण लेनिन-मार्क्स इत्यादी कम्युनिस्ट नेत्यांच्या विचारसरणीला भुलतात व नक्षलवादाच्या क्रूर चळवळीत सामील होतात.नक्षलग्रस्त भागातील कारवायांना सुरक्षा दले प्रतिकार करत आहेतच तेथील सामान्य जनता जी अनेक वर्षांपासून विकासगंगेपासून लांब होती तिला आता मूलभूत सेवा मिळायला लागल्यामुळे नक्षलवाद्यांचा नाद सोडताना दिसत आहे.समस्या मात्र अजून संपलेली नाही.तरुणांना फूस लावून,भुलवून नक्षलवादात खेचणारे अजूनही मोठ्या संख्येने सावज हेरत आहेत.दिल्ली,मुंबई इत्यादी शहरांमध्ये शहरी नक्षलवादी शहरातील युवकांना ह्या क्रूर मार्गात आणण्याचा प्रयत्न करत आहेत,नक्षली बनण्यास प्रवृत्त करत आहेत.हे शहरी नक्षलवादी अत्यंत सहजपणे आपल्या शहरात फिरत असतात आणि कोणी तरुण सापडला कि त्याचा अंदाज घेऊन Brain Washing करतात.ज्याप्रमाणे नक्षलग्रस्त भागातील जनता सुरक्षा दलांची मदत करू लागली आहे त्याचप्रमाणे शहरी नक्षलवाद्यांच्या कारवायांबद्दल कुणकुण लागताच पोलिसांना संबंधित माहिती देणे,तरुणांना ह्या धोक्याची माहिती देणे तसेच नक्षलवाद्यांबद्दल कणव असणाऱ्यांचे,नक्षलवादाचे समर्थन करणाऱ्यांचे खरे रूप जगासमोर आणणे हे प्रत्येक सजग नागरिकाचे कर्तव्य आहे.
                  
                  दहशतवाद ही देखील नक्षलवाद इतकीच भीषण आणि भारताला भेडसावणारी समस्या आहे.गेले २-३ दशके आपण दहशतवादाशी झुंझत आहोत.नक्षलवादाप्रमाणेच दहशवादी देखील brain washing चा वापर करून त्यांच्या जाळ्यात तरुण ओढतात.गेल्या काही वर्षात प्रामुख्याने २६/११ च्या मुंबई हल्ल्यानंतर दहशतवादाविषयी जागरूकता,सतर्कता नागरिकांमध्ये दिसते आहे.ह्यामध्ये सुरक्षा यंत्रणांचा योगदानही आहेच.समस्येने आता एक वेगळे वळण घेतले आहे.ISIS ह्या अतिरेकी संघटनेमध्ये सामील होण्यासाठी भारतातून तरुण लाक्षणिक प्रमाणात इराक-सीरिया मध्ये जात आहेत.अतिरेकी संघटनांकडून प्रशिक्षण घेत आहेत.ISIS सारख्या अतिरेकी संघटनेचे ट्विटर हॅण्डल चालवणारा भारतातून हे  चालवत होता ही गंभीर बाब आहे.बदलत्या काळानुसार नवीन आव्हाने जन्माला येत असतात,जुन्या समस्या नवी रूप घेत असतात.इंटरनेट आणि सामाजिक माध्यमांनी अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या पण प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात त्याप्रमाणे समस्यांना जन्म देखील दिला.सामाजिक माध्यमांद्वारे वादग्रस्त गोष्टी करणे व समाजातील गटांमध्ये तेढ निर्माण करणे ही समस्या नवीनच उदयास आली आहे.समस्या नवीन असल्याने त्यातील बारकावे अजून नीट समोर आलेले नाहीत त्यामुळे प्रतिबंधक कायदे,यंत्रणा नीट तयार करता आलेले नाहीत.दर वेळी नवनवीन समस्या यातून निर्माण होताना दिसते.मोबाईल-कॉम्पुटर हॅक करणे,त्याद्वारे गोपनीय माहिती चोरणे,आर्थिक फसवणूक करणे ह्या गोष्टी वाढायला लागल्या आहेत.सामाजिक माध्यमांद्वारे भावनिक मुद्दे उपस्थित करून,भावना पेटवून दंगली घडवणे असल्या गोष्टीही घडायला लागल्या आहेत.इंटरनेटच्या युगात एखादा माणूस एका जागेवर बसून काहीतरी लिहून,बोलून शेकडो किलोमीटर अंतरावर दंगे घडवून आणू शकतो.अश्यावेळी कोणतीही गोष्ट फॉरवर्ड-शेअर करताना काळजी घेणं हे एक सुज्ञ नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे.  
       
               भारत प्रचंड विविधता असलेला,क्षेत्रफळाने विस्तीर्ण देश आहे.विविधता हे वरदान असले तरी ह्या सांस्कृतिक वैविध्याचे नाव पुढे करू अनेक फुटीरतावादी चळवळी भारतात चालतात.पंजाब मधील खलिस्तान असेल किंवा ईशान्य भारतातील अनेक गट असतील हे त्या भागांमध्ये अशांतता पसरवत आहेतच.ह्या दोन प्रदेशांमधले अजून एक साधर्म्य म्हणजे अमली पदार्थांचा ह्या भागांमध्ये झालेला शिरकाव आणि त्याच्या व्यसनात बुडणारे तरुण.
   
                    बदलत्या काळानुसार सुरक्षा समस्या बदलत आहेत,नवीन जन्माला येत आहेत.ह्यामुळे समस्यांमध्ये होत असलेले बदल,नवीन समस्या आणि त्यांचा भविष्यकालीन परिणाम ह्यांचा अभ्यास फार महत्वाचा आहे.वेगवेगळ्या स्तरांवर हा अभ्यास होत असतो.राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार,केंद्र-राज्य सरकारच्या गृह मंत्रालयातील अनुभवी अधिकारी,वरिष्ठ पोलीस अधिकारी ह्या पातळी पासून स्थानिक पोलीस स्थानकांपर्यंत ह्याचा अभ्यास,विचारविनिमय केला जातो.त्याचबरोबर देशाचा सुजाण नागरिक म्हणून आपल्याला आपल्या देशाच्या सुरक्षा आव्हानांची किमान माहिती असलीच पाहिजे.अंतर्गत सुरक्षेसमोरील आव्हाने कोणतीही असतील.नक्षलवाद असेल,फुटीरतावादी हिंसक चळवळी असतील,दहशतवाद असेल किंवा सायबर सुरक्षा,दंगली,तस्करी,हवाला,अमली पदार्थ असतील ह्या सर्वांशी लढण्यासाठी सरकारी सुरक्षा यंत्रणा तयार आहेतच पण ह्या सर्वांमध्ये एक महत्वाचा भाग आहे तो म्हणजे आपले-समाजाचे योगदान.सामाजिक सहकार्याशिवाय अंतर्गत सुरक्षा पूर्ण होऊच शकत नाही.सुरक्षा यंत्रणांना मर्यादा असतात,त्यांचे ठराविक कार्यक्षेत्र असते,त्यांचे संख्याबळ मर्यादित असते.ह्या मर्यादा सामान्य माणसावर नसतात.सुरक्षा यंत्रणांचे गुप्तचर खाते असतेच पण जागरूक नागरिक हा देखील गुप्तहेराइतकाच महत्वाचा आहे.एखाद्या जागरूक नागरिकाने पोलिसांना विशिष्ट गुन्ह्याबद्दल माहिती पुरवल्याने गुन्हेगारांचे बेत उधळवून लावण्यात अनेकदा पोलिसांना यश मिळाले आहे.

                    
                  सामान्य माणसांचे सुरक्षेतील काम हे फक्त पोलिसांना माहिती देणे एवढेच मर्यादित नाही.ह्या पलीकडेही अनेक गोष्टी आपण करू शकतो.शकतो.हॅरी पॉटर ह्या सुप्रसिद्ध इंग्लिश कादंबरी मध्ये जेव्हा व्हॉल्डेमॉर्ट हा शक्तिशाली-दुष्ट जादूगार पुनर्जीवित होतो त्यानंतर विद्यार्थ्यांना सावध करताना हॉगवर्ट्स शाळेचे मुख्याध्यापक डम्बल्डडोर म्हणतात- "I'm reminding you a sobering fact.Every day,every hour....this very minute perhaps...dark forces attempt to penetrate this castle's wall.But in the end their greatest weapon is you."  हीच गोष्ट आपल्या देशाबद्दल आहे.देशांतर्गत व बाहेरील अनेक विघातक शक्ती ज्या आपल्या देशामध्ये अशांतता पसरवू पाहत आहेत ते आपल्या देशातील नागरिकांचाच वापर करतात.म्हणून अश्या शक्ती ओळखून त्यांच्यापासून आपण सावध राहिले पाहिजेच पण त्याचबरोबर या शक्तींच्या जाळ्यात फसत असलेल्यांचीही जागृती केली पाहिजे.सध्याच्या काळामध्ये अंतर्गत समस्यांना बाह्य जगातून सहकार्य मिळत असते.ह्या बाह्य शक्ती सामान्य नागरिकांकडे soft target म्हणून पाहतात.सामान्य नागरिकांनी आता एकत्र येऊन आपण soft target राहिलेलो नसून आम्हीही आमच्या देशाची स्वतंत्र सुरक्षा यंत्रणा आहोत हे दाखवून द्यायची वेळ आली आहे.देशासमोर सामाजिक,आर्थिक,राजकीय इत्यादी कोणतीही समस्या असो ह्या समस्यांचे निर्मूलन करण्यात जनतेचा सहभाग आणि जनतेचे प्रतिनिधित्व ह्या अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत.सुरक्षा सारख्या विषयात जिथे नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा प्रश्न असतो अश्या ठिकाणी तर आपण नागरिकांनी  सतत सतर्क व सावध राहिले  पाहिजे.
      याबद्दल महाभारताच्या शांतिपर्वामध्ये म्हटले आहे-

                न राज्यं न च राजाSSसीत्,
                न दंडो न च दण्डीकः ।
                धर्मणैव प्रजाः सर्वा,
                रक्षन्तीस्म परस्परम् ।। 

             [राज्य किंवा राजा,कोणताही दंड किंवा दंड करणारा{न्यायमूर्ती};प्रजेचे रक्षण करत नाही.प्रजा त्यांच्या धर्मामुळे{कर्तव्यांमुळे} परस्परांचे रक्षण करते.]


                                                       ©श्रवण दांडेकर 

                    
         
                  

Comments

Popular posts from this blog

गुण गाईन आवडी!!🙏

दिसामाजी काहीतरी लिहावे हा समर्थ रामदासांचा उपदेश.हाच उपदेश आचरणात आणायचा ठरवलं,हा ब्लाॅग सुरू करायच मनात आलं. आज 8 Nov. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व अर्थात पु.ल.देशपांडे उर्फ भाई यांचा जन्मदिन. मराठी मुलांचा पुलंशी पहिला परिचय होतो तो नाच रे मोरा मधून!! मी पुलंच वाचलेलं पहिलं पुस्तक हे 'व्यक्ती आणि वल्ली'.हे पुस्तक वाचल्यापासून मी अक्षरशः पुलंच्या प्रेमात पडलो.त्यानंतर त्यांच मिळेल ते पुस्तक वाचत गेलो.(पुस्तकं वाचण्याच्या बाबतीत माझाही जरा सखाराम गटणे होतो!!😅) पुलंची निरीक्षण शक्ती काही वेगळीच होती.आणि लिहण्याची आणि सादर करण्याची शैली तर खासचं!! बटाट्याची चाळीतील गोंधळ असो वा चितळे मास्तरांचा तास सर्व काही त्यांनी डोळ्यासमोर उभं केलं!!अपूर्वाई,पूर्वरंग,जावे त्याच्या देशा यांमधून Without passport,visa जगप्रवास घडवला!! हजरजबाबी म्हटल्यावर 2 व्यक्ती समोर येतात त्या म्हणजे आचार्य अत्रे आणि पुल!कोट्या आणि पुलं म्हणजे जवळजवळ समानार्थीच!कितीही उदाहरणं दिली तरी कमीच. पुलंनी अनेक चित्रपटांच्या कथा लिहल्या,संगीत दिलं,नाटकं लिहली.माझं सर्वात आवडतं नाटक म्हणजे जाॅर्ज बर्नाॅ

The High Functioning Sociopath!!

                              गुप्तहेर या माणसाबद्दल सर्वांनाच एक आकर्षण असतं.फिक्शन साठी तर गुप्तहेर हा एक मोठा विषय आहे.फिक्शनच्या जगामध्ये 007 जेम्स बॉण्ड पासून ते अगदी झी मराठी वरची अस्मिता या रेंज मध्ये अनेक गुप्तहेर आहेत पण या सगळ्यांचा आद्य जनक आणि ज्याचा ठसा प्रत्येक गुप्तहेर कथेत कुठेना कुठे तरी दिसतोच तो म्हणजे शेरलॉक होल्म्स!!अतिशय तीव्र निरीक्षण शक्ती,Science Of Deduction ही स्वतःची तर्क करण्याची पद्धत यामुळे शेरलॉक हा सगळ्यात वरचढ ठरतो!!                          ३१ ऑक्टोबर १८५७ या दिवशी ' अ स्टडी इन स्कार्लेट 'ही शेरलॉक होम्स ची पहिली कथा सर आर्थर कॉनन डॉयलांच्या लेखणीतून उतरून वाचकांच्या समोर आली.त्यानंतर तब्बल २ वर्षांनी 'साइन ऑफ फोर' प्रसिद्ध झाली.(हाच आदर्श सध्या BBC चालवत्ये!!) नंतर स्ट्रॅन्ड या लंडन मधल्या प्रसिद्ध मासिकाने दरमहा कथेची मागणी केली आणि स्ट्रॅन्ड मधून दर महिन्याला एक शेरलॉक होम्स कथा प्रसिद्ध व्हायला लागली.१९ व्या शतकातलं घोडागाड्यांमधून फिरणारं,दाट धुक्यातलं लंडन सर आर्थर कॉनन डॉयल यांनी डोळ्यासमोर उभं के

समस्या भारतासमोरच्या-गरिबी!!

           भारतात गरिबी आहे हे वास्तव आहे.स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारतासमोर गरिबी हा प्रश्न आहेच.तेव्हा पासून आजतागायत गरिबी निर्मुलनासाठी अनेक योजना आल्या,आकड्यांमध्ये मध्ये फरक दिसतोय पण अजूनही गरिबीचं प्रमाण खूप आहे.ज्या प्रमाणे डायबेटीस कधी एकता येत नाही इतर अनेक व्याधी घेऊन येतो त्याच प्रमाणे गरिबी बरोबर पण इतर अनेक समस्या जोडून येतात.फक्त गरिबीमुळे ज्या समस्या निर्माण होतात त्याच गरिबीची कारणे ठरतात.ह्यालाच गरीबीचे अनिष्ट चक्र(Vicious Circle Of Poverty) म्हणतात.                                    गरिबी म्हणजे काय किंवा गरीब म्हणजे कोण हे ठरवणं कठीण काम आहे कारण मुळात गरिबी हि तुलनात्मक आहे.तरी सर्वसाधारणपणे गरिब गट ठरवण्यासाठी गरिबीच्या काही व्याख्या,काही निकष  ठरवले गेले.काळानुसार हे निकष बदलत गेले.एखादी रेषा ठरवून त्या रेषेखाली येणारी लोकसंख्या गरीब धरण्यात येते.ह्या रेषेला-सीमेला दारिद्र्य रेषा म्हणतात.ही दारिद्र्य रेषा वेगवेगळ्या निकषांवर असते.उदा.-कॅलरी सेवन,प्राप्ती,खर्च इत्यादी.सध्या भारतामध्ये खर्च निकषावर आधारित गरिबी रेषा आहे.शहरी भागात ४७ रु. प्रतिदिन तर ग