भारतात गरिबी आहे हे वास्तव आहे.स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारतासमोर गरिबी हा प्रश्न आहेच.तेव्हा पासून आजतागायत गरिबी निर्मुलनासाठी अनेक योजना आल्या,आकड्यांमध्ये मध्ये फरक दिसतोय पण अजूनही गरिबीचं प्रमाण खूप आहे.ज्या प्रमाणे डायबेटीस कधी एकता येत नाही इतर अनेक व्याधी घेऊन येतो त्याच प्रमाणे गरिबी बरोबर पण इतर अनेक समस्या जोडून येतात.फक्त गरिबीमुळे ज्या समस्या निर्माण होतात त्याच गरिबीची कारणे ठरतात.ह्यालाच गरीबीचे अनिष्ट चक्र(Vicious Circle Of Poverty) म्हणतात.
गरिबी म्हणजे काय किंवा गरीब म्हणजे कोण हे ठरवणं कठीण काम आहे कारण मुळात गरिबी हि तुलनात्मक आहे.तरी सर्वसाधारणपणे गरिब गट ठरवण्यासाठी गरिबीच्या काही व्याख्या,काही निकष ठरवले गेले.काळानुसार हे निकष बदलत गेले.एखादी रेषा ठरवून त्या रेषेखाली येणारी लोकसंख्या गरीब धरण्यात येते.ह्या रेषेला-सीमेला दारिद्र्य रेषा म्हणतात.ही दारिद्र्य रेषा वेगवेगळ्या निकषांवर असते.उदा.-कॅलरी सेवन,प्राप्ती,खर्च इत्यादी.सध्या भारतामध्ये खर्च निकषावर आधारित गरिबी रेषा आहे.शहरी भागात ४७ रु. प्रतिदिन तर ग्रामीण भागात ३२ रु. प्रतिदिन ह्या पेक्षा कमी खर्च असेल तर ती व्यक्ती दारिद्र्य रेषेखाली आहे असे मानण्यात येते.भारताच्या एकूण लोकसंख्येच्या २१.९% नागरिक दारिद्र्यरेषेखाली आहेत.ही संख्या प्रचंड आहे.गरिबी कमी करणं हे आपल्यासमोरचं मोठं आव्हान आहे.ह्या आव्हानाचे,समस्येचे उत्तर हे सखोल अभ्यासातूनच शोधले पाहिजे.उत्तर हे कायमस्वरूपी असणे महत्वाचे आहे.नाहीतर हा भस्मासूर भारताच्या विकासात कायमस्वरूपी अडथळा होऊन बसेल.
कोणत्याही समस्येचा अभ्यास करताना त्याच्या कारणांचा अभ्यास महत्वाचा ठरतो.गरिबीची अनेक कारणे आहेत.बेकारी,शिक्षणाचा ,आरोग्याचा अभाव ही महत्वाची कारणे आहेत.गरिबी ही चक्राकार समस्या आहे.वर म्हटल्याप्रमाणे गरिबीची कारणे हीच गरिबीचे परिणाम ठरतात.गरिबीच्या अनेक कारणांपैकी आपली भरमसाट लोकसंख्या हे एक महत्वाचं कारण आहे.लोकसंख्या ही देशाची शक्ती आहे वगैरे जरी खरं असला तरी प्रमाणाबाहेर वाढलेली लोकसंख्या ही नक्कीच देशहिताची नाही.ही लोकसंख्या निरनिराळ्या समस्या निर्माण करते.लोकसंख्या हे बेकारी मागील एक महत्वाचे कारण आहे पण एकमेव नाही.शिक्षणाचा अभाव देखील बेकारीमध्येच परावर्तित होतो.भारतात कधी कधी अशी स्थिती दिसते की कंपन्यांमध्ये कामगार कमी पडत आहेत पण योग्य माणसे मिळत नाहीत.अशी हि स्थिती दिसते की जे काम करायला १ माणूस पुरु शकतो ते काम १० जण करतात.शेती मध्ये हे बऱ्याचदा बघायला मिळतं.ह्यामुळे १ ला मिळणाराला मोबदला १० जणांमध्ये विभागला जातो.ह्यामुळे कोणीच गरिबीतून बाहेर येऊ शकत नाही.शिक्षणाच्या अभावाप्रमाणेच आरोग्याचा अभाव हे देखील एक महत्वाचे कारण आहे.आरोग्याचा अभाव कामाचे तास,दिवस यांवर परिणाम करतो.शिक्षणाच्या अभावामुळे आधुनिक ज्ञान नसल्याने व आरोग्याच्या अभावामुळे शारिरीक स्थिती मजबूत नसल्याने कार्यक्षमता कमी होते.कार्यक्षमता कमी त्यामुळे उत्पादकता कमी,उत्पादन कमी त्यामुळे प्राप्ती कमी,प्राप्ती कमी त्यामुळे खर्च कमी आणि बचत त्याहूनही कमी!!ही सायकल चालू राहते.जे काही उत्पन्न मिळतं ते अन्न,वस्त्र ,निवारा ह्या मुलभूत गरजा भागविण्यात खर्च होतं आणि शिक्षण आणि आरोग्य ह्या मूलभूत गरजा ज्या गरिबीतून बाहेर काढण्यात मदत करू शकतात त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं.व्यसनाधीनता हे देखील मोठे कारण आहे.दारू,अमली पदार्थ ह्यांच व्यसन पैसे तर संपवतच त्याच बरोबर आरोग्यही बिघडवतं.सर्वात म्हणजे ह्याचा मोठा परिणाम मुलांवर होतो.शिक्षणाचा अभाव असतो,गरिबीमुळे मजुरी करावी लागते.अश्या स्थितीत मुले लहान वयापासूनच व्यसनाधीन होतात.अजून एका पिढीची गरिबी निश्चित होते.
काही दिवसांपूर्वी राहुल गांधी 'गरिबी ही मानसिक अवस्था आहे' असं म्हणाला होता.हे मत मात्र त्याच १००% बरोबर आहे.भारतामध्ये गरिबी ही केवळ सरकारी धोरणांमधील त्रुटीमुळे नाही तर त्या (गरीब) व्यक्तींच्या स्वभावामुळे व निष्क्रियतेमुळे ही आहे.'NO ONE IS POOR BY CHOICE!' हे जरी खर असलं तरीही माणसं निष्क्रियतेमुळेही गरीब राहतात हे सत्य आहे.शिक्षण नाही,एखाद तंत्र नाही त्यामुळे काम नाही अश्या परिस्थितीत एखादं तंत्र शिकून ते काम सुरु करणारी काही माणसं दिसतात पण बहुसंख्य सिग्नलवर,रस्त्यावर,मंदिरांजवळ भीक मागताना दिसतात किंवा आपल्या योग्यतेपेक्षा प्लंबर,सुतार,इलेक्टरेशीअन,वेटर इत्यादी काम कमी आहेत समजून बेकार बसून राहतात.ह्यामुळे इतका विरोधाभास दिसतो की एकाच दिवशी वर्तमानपत्रात बेरोजगारांचा आकडा व कामगार न मिळाल्याने कंपन्या बंद अश्या दोन्ही बातम्या येतात. ह्याचबरोबर कष्ट करण्यापेक्षा easy money मिळवण्याकडे कल असतो.
गरिबीची कारणे शोधत बसलो तर वेगवेगळ्या प्रकारे ती दिसत राहतील आणि परिणाम हे तर वेगवेगळे आव्हान आहे.गरिबी हे अनेक समस्यांचे महत्वाचे कारण आहे.त्यामुळे गरिबी निर्मूलन हे एक महत्वाचे काम आहे आणि हे काम एकाच बाजूने नाही तर अनेकविध बाजूंनी,अनेकांच्या प्रयत्नांनी झाले पाहिजे.स्वातंत्र्य मिळाल्या पासून ह्या साठी अनेक प्रयत्न झाले.'गरिबी हटाव' झालं,पंचवार्षिक योजनांच उद्दिष्ट गरिबी निर्मुलन झालं,राज्य-केंद्र सरकारांकडून अनेक योजना जाहीर झाल्या; परिस्थिती बदलली हे सत्य आहे पण अजूनही अनेक पाऊले पुढे जायचं आहे.
भारतातील गरिबीची स्थिती! |
देशांचा सर्वांगीण विकास Human Development Index(HDI) मध्ये मोजतात.हा मोजताना सरासरी आयुर्मान,सरासरी शालेय वर्षे व दरडोई उत्पन्न या गोष्टी विचारात घेतल्या जातात. गरिबी ह्या तिन्ही गोष्टींशी directly related आहे.त्यामुळे देशाचा सर्वागीण विकास करायचा असेल तर गरिबी हटाव कार्यक्रम अधिक जोमाने,डोळसपणे हाती घ्यायला हवा,पूर्णत्वाला न्यायला हवा.यानेच आपल्या देशाचा विकास होईल,यानेच आपल्या देशासमोरील अनेक समस्यांचं निराकरण होईल.
United Nations Sustainable Development Goals मध्ये हे गरिबी निर्मूलन हेच प्रथम उद्दिष्ट आहे.आपणही प्रथम आपल्या देशातून गरिबी निर्मूलन करून 'वसुधैव कुटुंबकम' हे वाक्य जपून सर्व जगाची मदत करूया.या संदर्भात प्रत्येकाला काय करता येईल या वर UN ने मार्गदर्शन करून ठेवलेच आहे आपण फक्त आता त्यावर मार्गक्रमण करू.
©श्रवण दांडेकर
True!!!
ReplyDeletebetmatik
ReplyDeletekralbet
betpark
tipobet
slot siteleri
kibris bahis siteleri
poker siteleri
bonus veren siteler
mobil ödeme bahis
YOJJCQ
bahis siteleri
ReplyDeletehttps://bahissiteleri.io
youwin
bets10
1xbet
M2İ60R
samsun
ReplyDeleteşişli
elazığ
kadıköy
ordu
RA5MDX