Skip to main content

Be Lesscash!!

  

            
                               Demonetisation झालं आणि भारतात कॅशलेस इकॉनॉमी चे वारे वाहायला सुरवात झाली.पंतप्रधानांनी देखील कॅशलेस व्हायचे नारे दिले.पण कॅशलेस इकॉनॉमी म्हणजे नक्की काय?? नक्की करायच काय?? या सारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं-शंकानिरसन करण्यासाठी हा लेख.

  

  कॅशलेस इकॉनॉमी म्हणजे काय??भारतात शक्य आहे का??

           कॅशलेस इकॉनॉमी अशी इकॉनॉमी ज्यात जास्तीतजास्त व्यवहार हे कार्ड वा डिजिटल मेडीयम होतात.थोडक्यात काय तर कुठेही डायरेक्ट कॅश मध्ये पैसे द्यायचे नाहीत.कॅश कमीतकमी वापरायची.पुढचा प्रश्न महत्वाचा ठरतो की हे भारतात शक्य आहे का??तर हो.नक्कीच होऊ शकत.प्रत्येक गोष्टीच्या सुरवातीच्या काळात गोष्टी अवघड,अशक्य वाटतात पण नंतर सवय होते आणि होऊन जातं.तसच हे हि होईल.आणि कोणतीही मोठी गोष्ट करताना २ गोष्टी फार महत्वाच्या ठरतात त्या म्हणजे राजकीय इच्छाशक्ती आणि जनसहभाग.या दोन्हीच्या सहकार्याने भारत नजीकच्या भविष्यकाळातच एक यशस्वी लेसकॅश इकॉनॉमी तर नक्कीच होऊ शकतो.

 कॅशलेस व्हायचा कसं??

           साधारणपणे मनात येणारा प्रश्न.तुमच बँक अकाउंट आहे,कॅशलेस इकॉनॉमी साठी पहिल पाऊल.अकाउंट बरोबर ATM कम डेबिट कार्ड असेल तर काम अजून सोप आणि जर तुमचा मोबाइल नंबर जर अकाउंट शी जोडला असेल तर आता कॅशलेस होण्यात काहीच अडचण नाही.तसेच सध्या अनेक बॅंक्स आणि काही खासगी कंपनी मोबाइल वॉलेट (उदा-Paytm,Freecharge,SBI Buddy etc.) सुविधा पुरवतात.अश्या अनेक पर्यायांचा वापर करून आपण लेसकॅश होऊ शकतो.

  कॅशलेस व्यवहार कसे करायचे??


  • बँकेच्या मदतीने व्यवहार-  आपण काही व्यवहार हे कॅशलेस करतच आलो आहोत.यांच प्रमाण मात्र आता वाढायला हवं.उदा.-चेक पेमेंट,DD,NEFT ,RTGS  अश्या बॅंक्स ज्या सेवा पुरवतात त्यांचा वापर केला पाहिजे.मोबाईल विकत घेतला चेक द्या,भाड्याच्या घरात राहतोय तर भाडं NEFT ने डायरेक्ट घरमालकाच्या अकाउंट मध्ये भरा.अश्या अनेक गोष्टींसाठी शक्य तिथे याचा वापर केला पाहिजे.



  • नेट  बँकिंग /मोबाईल बँकिंग- आता सर्वच बॅंक्स या दोन सेवा पुरवतात.या सेवांचा फायदा घेऊन घर बसल्या किंवा असू तिथून बँकेतही न जाता पैसे ट्रान्सफर करू शकतो.या सेवांमुळे आपण बॅंक्स मध्ये न जाताही त्याची सर्व काम करू शकतो आणि वेळही फार लागत नाही कारण लाईन नाही.याद्वारे आपण निरनिराळी बिल्स हि भरू शकतो.UPI (Unified Payment Interface) ह्या NPCI(National Payments Corporation of India) ने डेव्हलप केलेल्या app मध्ये अनेक बॅंक्स ची  नेट बँकिंग व्यवस्था एक केली आहे.तसेच याच NPCI ने *९९# ही सुविधा आणली आहे,जिच्या साहाय्याने इंटरनेट सुविधा नसतानाही तुमचा मोबाईल नंबर बँक अकाउंट शी जोडलेला असेल तर नेट बँकिंग ने जी काम होतात ती सर्व आपण करू शकतो.SMS सुविधेचे चार्जेस फक्त लागतात.                                                                                                                            



  • क्रेडिट/डेबिट कार्ड  पेमेंट -  क्रेडिट-डेबिट कार्ड स्वीप करून पण डायरेक्ट खरेदी करू शकतो तसेच ऑनलाईन पेमेंट्स हि करू शकतो.बहुतांश दुकाने,हॉटेल्स कार्ड पेमेंट स्विकारतात आणि आता कॅशलेस इकॉनॉमी ला चालना देण्यासाठी केंद्र सरकार ने कार्ड पेमेंट्स वर वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या आहेत तसाच सध्या तरी या transactions वरचा टॅक्स कमी केला आहे. http://finmin.nic.in/press_room/2016/Pkg_promotion_digitalCashless.pdf


              दुकानात स्वीप करून कार्ड पेमेंट करायची प्रक्रिया एकदम सोपी आहे,फक्त आपण atm वापरताना जो PIN टाकतो तोच टाकायचा की लगेच पेमेंट होता.ऑनलाईन पेमेंट करताना कार्ड चा १६ आकडी नंबर,कार्ड एक्सपायरी डेट,CVV नंबर असा सगळं दिलेल्या रकान्यांमध्ये भरलायला लागतं आणि आपल्या Register Mobile Number वर आलेला One Time Password(OTP) टाकायला लागतो की पेमेंट होतं.
 या कार्ड्स-नेट बँकिंग चा वापर करून आपण अनेक काम करू शकतो.उदा.-लाईट बिल्स,फोन बिल्स अशी बिल्स भरण;बस-रेल्वे-विमान यांची रिझर्व्हशन्स करणं,Movie Tickets काढणं,ऑनलाईन शॉपिंग इत्यादी अनेक व्यवहार घर बसल्या कमीत कमी वेळेत होतात. 

  • मोबाईल वॉलेट्स- सध्या अनेक वेगवेगळ्या कंपनी आणि काही बॅंक्स मोबाईल वॉलेट सुविधा पुरवतात. ह्या मध्ये App वापरून  डेबिट कार्ड-नेट बँकिंग सुविधा वापरून बँक अकाउंट मधले पैसे या मोबाईल वॉलेट मध्ये घ्यायचे आणि या app चा वापर करून पेमेंट्स करायची.या मध्ये फक्त एकच उणीव म्हणता येईल ती म्हणजे पैसे देणाऱ्या व घेणाऱ्या दोघांकडेही एकच मोबाईल वॉलेट अँप हवं.मोबाईल वॉलेट मध्ये जमा असलेले पैसे आपण परत बँक अकाउंट मध्ये जॅमही करू शकतो.कार्ड्स ने करता येणारी सर्व काम आपण या मोबाईल वॉलेट मधनं पण करू शकतो,App  वरच वेगवेगळ्या पेमेंट्स चा option येतो.प्रत्येकवेळी वेगवेगळ्या वेबसाईट वर जायची गरज नाही.


  • लेसकॅश  इकॉनॉमी चे फायदे-   
  1. अधिकाधिक व्यवहार हे बँकद्वारे झाल्याने पारदर्शकता येईल.काळा पैसे तयार व्हायच्या प्रक्रियेला काही प्रमाणात तरी आळा बसेल. 
  2. वापरायला सोपे तसेच जलद त्यामुळे वेळेची बचत होईल. 
  3. सगळी Transactions  रेकॉर्ड वर आल्याने हिशोब ठेवायलाही सोपा जाईल.खर्च व्यवस्थित दाखवू शकतो. 
  4. कार्ड-फोन चोरीला गेला तरी कार्ड-अकाउंट ब्लॉक करून आपण त्यांचा गैरवापर थांबवू शकतो. 
  5. काही दुकानदार आणि सध्या केंद्र सरकार पण अश्या पेमेंट्स ना उत्तेजना देण्यासाठी डिस्काउंट देत आहेत. 
  6.  गुन्हेगारीला आळा बसेल. 
            भारत कॅशलेस होणं कसं कठीण आहे,कसा होणारच नाही,अशी चर्चा न करत बसता कसा होईल या साठी कृती केली पाहिजे.महात्मा गांधीजी जसं म्हणाले आहेत-"Be The Change That You Want To See In The World" त्या प्रमाणे आपण स्वतः प्रथम लेसकॅश व्हायला हवं आणि किमान ४-५ जणांना तरी या लेसकॅश इकॉनॉमी च्या गंगेत सामावून घ्यायाला मदत करायला हवी.
                                                                                                  -श्रवण दांडेकर 😃  

Comments

Popular posts from this blog

गुण गाईन आवडी!!🙏

दिसामाजी काहीतरी लिहावे हा समर्थ रामदासांचा उपदेश.हाच उपदेश आचरणात आणायचा ठरवलं,हा ब्लाॅग सुरू करायच मनात आलं. आज 8 Nov. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व अर्थात पु.ल.देशपांडे उर्फ भाई यांचा जन्मदिन. मराठी मुलांचा पुलंशी पहिला परिचय होतो तो नाच रे मोरा मधून!! मी पुलंच वाचलेलं पहिलं पुस्तक हे 'व्यक्ती आणि वल्ली'.हे पुस्तक वाचल्यापासून मी अक्षरशः पुलंच्या प्रेमात पडलो.त्यानंतर त्यांच मिळेल ते पुस्तक वाचत गेलो.(पुस्तकं वाचण्याच्या बाबतीत माझाही जरा सखाराम गटणे होतो!!😅) पुलंची निरीक्षण शक्ती काही वेगळीच होती.आणि लिहण्याची आणि सादर करण्याची शैली तर खासचं!! बटाट्याची चाळीतील गोंधळ असो वा चितळे मास्तरांचा तास सर्व काही त्यांनी डोळ्यासमोर उभं केलं!!अपूर्वाई,पूर्वरंग,जावे त्याच्या देशा यांमधून Without passport,visa जगप्रवास घडवला!! हजरजबाबी म्हटल्यावर 2 व्यक्ती समोर येतात त्या म्हणजे आचार्य अत्रे आणि पुल!कोट्या आणि पुलं म्हणजे जवळजवळ समानार्थीच!कितीही उदाहरणं दिली तरी कमीच. पुलंनी अनेक चित्रपटांच्या कथा लिहल्या,संगीत दिलं,नाटकं लिहली.माझं सर्वात आवडतं नाटक म्हणजे जाॅर्ज बर्नाॅ

The High Functioning Sociopath!!

                              गुप्तहेर या माणसाबद्दल सर्वांनाच एक आकर्षण असतं.फिक्शन साठी तर गुप्तहेर हा एक मोठा विषय आहे.फिक्शनच्या जगामध्ये 007 जेम्स बॉण्ड पासून ते अगदी झी मराठी वरची अस्मिता या रेंज मध्ये अनेक गुप्तहेर आहेत पण या सगळ्यांचा आद्य जनक आणि ज्याचा ठसा प्रत्येक गुप्तहेर कथेत कुठेना कुठे तरी दिसतोच तो म्हणजे शेरलॉक होल्म्स!!अतिशय तीव्र निरीक्षण शक्ती,Science Of Deduction ही स्वतःची तर्क करण्याची पद्धत यामुळे शेरलॉक हा सगळ्यात वरचढ ठरतो!!                          ३१ ऑक्टोबर १८५७ या दिवशी ' अ स्टडी इन स्कार्लेट 'ही शेरलॉक होम्स ची पहिली कथा सर आर्थर कॉनन डॉयलांच्या लेखणीतून उतरून वाचकांच्या समोर आली.त्यानंतर तब्बल २ वर्षांनी 'साइन ऑफ फोर' प्रसिद्ध झाली.(हाच आदर्श सध्या BBC चालवत्ये!!) नंतर स्ट्रॅन्ड या लंडन मधल्या प्रसिद्ध मासिकाने दरमहा कथेची मागणी केली आणि स्ट्रॅन्ड मधून दर महिन्याला एक शेरलॉक होम्स कथा प्रसिद्ध व्हायला लागली.१९ व्या शतकातलं घोडागाड्यांमधून फिरणारं,दाट धुक्यातलं लंडन सर आर्थर कॉनन डॉयल यांनी डोळ्यासमोर उभं के

समस्या भारतासमोरच्या-गरिबी!!

           भारतात गरिबी आहे हे वास्तव आहे.स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारतासमोर गरिबी हा प्रश्न आहेच.तेव्हा पासून आजतागायत गरिबी निर्मुलनासाठी अनेक योजना आल्या,आकड्यांमध्ये मध्ये फरक दिसतोय पण अजूनही गरिबीचं प्रमाण खूप आहे.ज्या प्रमाणे डायबेटीस कधी एकता येत नाही इतर अनेक व्याधी घेऊन येतो त्याच प्रमाणे गरिबी बरोबर पण इतर अनेक समस्या जोडून येतात.फक्त गरिबीमुळे ज्या समस्या निर्माण होतात त्याच गरिबीची कारणे ठरतात.ह्यालाच गरीबीचे अनिष्ट चक्र(Vicious Circle Of Poverty) म्हणतात.                                    गरिबी म्हणजे काय किंवा गरीब म्हणजे कोण हे ठरवणं कठीण काम आहे कारण मुळात गरिबी हि तुलनात्मक आहे.तरी सर्वसाधारणपणे गरिब गट ठरवण्यासाठी गरिबीच्या काही व्याख्या,काही निकष  ठरवले गेले.काळानुसार हे निकष बदलत गेले.एखादी रेषा ठरवून त्या रेषेखाली येणारी लोकसंख्या गरीब धरण्यात येते.ह्या रेषेला-सीमेला दारिद्र्य रेषा म्हणतात.ही दारिद्र्य रेषा वेगवेगळ्या निकषांवर असते.उदा.-कॅलरी सेवन,प्राप्ती,खर्च इत्यादी.सध्या भारतामध्ये खर्च निकषावर आधारित गरिबी रेषा आहे.शहरी भागात ४७ रु. प्रतिदिन तर ग